शिक्षा

कोण आहेत राजन साळवी ? शिवसेनेचे लागोपाठ तीन वेळचे आमदार, पराभवाने ठाकरेंना सोडून शिंदेंकडे गेले

शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या राजापूर येथील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी अखेर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. त्यांनी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. राजन साळवी हे पराभूत झाल्याने पक्षनेतृत्वाविराधात नाराज झाले होते. त्यांनी मातोश्रीवरील बैठकीत आपल्या पराभवाला थेट शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत यांनाच जबाबदार धरले होते. परंतू उद्धव ठाकरे यांनी तुम्ही म्हणताय म्हणून आणखी कोणाकोणाला काढायचे अशा आशयाचे वक्तव्य करीत त्यांच्यावर उलटा प्रश्न केला होता. त्यामुळे अखेर नाराज होत त्यांनी आणि भाजपात जायचा प्रयत्न केला. परंतू तेथून प्रतिसाद न मिळाल्याने गुरुवारी सायंकाळी अखेर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला मान्यता देत त्यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केला आहे.

राजापूरचे तीन वेळा आमदार झालेल्या राजन साळवी यांचा यंदा विधानसभेला पराभव झाला. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी त्यांचा पराभव केला.त्यामुळे बुधवारी त्यांनी ठाकरे यांच्याकडे उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. राजन साळवी यांनी ठाणे येथील आनंदमठात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

कोण आहेत राजन साळवी ?

राजन साळवी हे कोकणातील अस्सल मातीतील नेतृत्व असून शिवसेनेशी त्यांची नाळ १९९३-९४ च्या दरम्यान जुळली होती. रत्नागिरीच्या नगर परिषदेच्या इतिहासात ते पहिल्यांदा शिवसेनेचे महापौर बनले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत अनेक पदे भूषवली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीवार्द आणि तत्कालिन शिवसेना नेते नारायण राणे यांच्या पाठींब्याने ते रत्नागिरी जिल्हाप्रमुख देखील झाले. रत्नागिरी जिल्हाप्रमुख म्हणून  त्यांची कारकीर्द यशस्वी झाली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button